वाहतुकीस अडथळा ठरणारया फुल मार्केट तात्काळ हटवावे! – जगदिपसिंघ नंबरदार यांची मनपा आयुक्तांकडे मागणी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नांदेड:
हिंगोली गेट ब्रिजखालील फुल मार्केटमुळे शहरात होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीवर अखेर आवाज उठवण्यात आला आहे. शिवसेना उप शहर प्रमुख (दक्षिण नांदेड) तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. जगदिपसिंघ मोहनसिंघ नंबरदार यांनी आज (१९ नोव्हेंबर २०२५) नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या आयुक्तांना लेखी निवेदन देऊन हे फुल मार्केट तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे.


वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय:
निवेदनानुसार, महानगरपालिकेने हिंगोली गेट ब्रिजखालील जी जागा फुल मार्केटसाठी दिली आहे, त्या ठिकाणी दुकानादारांना वाहतुकीसाठी कोणतीही पर्यायी जागा किंवा सुविधा नाही. परिणामी, ग्राहक आणि विक्रेते रस्त्यावरच गर्दी करतात. या मार्केटच्या दोन्ही बाजूने वाहतूक होते, ज्यामुळे सतत कोंडीची समस्या निर्माण होते.
शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात:
श्री. नंबरदार यांनी निवेदनात विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. फुल मार्केट संकुलाजवळच सकाळ-संध्याकाळ शाळा भरते आणि सुटते. मुलांना शाळेत सोडण्यासाठी येणारे पालक, रिक्षाचालक आणि सामान्य नागरिकांना या वाहतूक कोंडीमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. मार्केटमुळे होणारा हा त्रास नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, वाहतुकीला होणारा अडथळा लक्षात घेऊन, हे फुल मार्केट तात्काळ इतरत्र योग्य ठिकाणी हलवावे, अशी आग्रही विनंती श्री. जगदिपसिंघ मोहनसिंघ नंबरदार यांनी महानगरपालिका आयुक्तांना केली आहे. या मागणीमुळे मनपा प्रशासन आता कोणती कार्यवाही करणार, याकडे नांदेडकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें